HomeUncategorizedस्व. किसनराव सदार विद्यालयात डॉ. बाबासाहेबांना अभिवादन.

स्व. किसनराव सदार विद्यालयात डॉ. बाबासाहेबांना अभिवादन.

६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन.

दैनिक लोकतंत्र
वाशिम :
जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात येत असलेल्या खडकी सदार येथील स्व. किसनराव सदार विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा उद्योजक डॉ. ज्ञानेश्वर पाटील सदार होते.
रिसोड तालुक्यातील खडकी (सदार) येथील स्व. किसनराव सदार विद्यालयामध्ये ६ डिसेंबर रोजी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ.ज्ञानेश्वर पाटील सदार होते.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री माधवराव जाधव मुख्याध्यापक, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री गजानन सदार मा .जि प शाळा खडकी सदार शाळा समिती अध्यक्ष, श्री दिलीप चोकटे ज्येष्ठ नागरिक हे होत. उपस्थितीमध्ये शाळेचे शिक्षक श्री प्रमोद बकाल, श्री सतीश वायाळ, श्री प्रदीप वाठोरे, श्रीराम फुपाटे, श्री माधव मार्कड, श्री मंगेश कोरडे , श्री शिवाजी काका सुरूशे यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आमंत्रित
सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणामध्ये शाळेचे शिक्षक श्री प्रदीप वाठोरे यांनी विद्यार्थ्यांना महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये वर्ग दहावीची कु. वैष्णवी सदार हिने आपल्या भाषणातून ज्वलंत मुद्दे आणि भारतीय संविधान याविषयी अतिशय सुंदर मनोगत व्यक्त करत सर्वांचे लक्ष वेधले.कार्यक्रमांचे प्रमुख मार्गदर्शक श्री माधवराव जाधव मुख्याध्यापक,यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये संविधानाची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली. आपला देश धर्मनिरपेक्ष आहे, त्यामुळे कोणत्याही धर्माचे व्यक्ती आपल्या देशामध्ये मोठ्या गर्वाने राहू शकतात. आपल्या देशाला एकजुटीने राहण्यासाठी, विकास करण्यासाठी, विज्ञानवादी बनण्यासाठी, संविधानाची खूप मोठी साथ आपल्याला लाभलेली आहे. प्रांतवाद, भाषावाद, यांना आपल्या देशामध्ये कुठलाच थारा नाही. आपला भारत देश अखंड आहे तो फक्त आणि फक्त संविधानामुळे.हे संविधान कसे अबाधित राहील याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. हीच महामानवाला खरी आदरांजली होईल असे विद्यार्थ्यांना समजून सांगितले. कार्यक्रमाचे पाहुणे श्री गजानन सदार यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेबांचा संघर्ष आणि संविधान निर्मितीमध्ये आलेल्या अडचणी या सर्वांची विद्यार्थ्यांना खोलवर माहिती दिली . आपली कर्तव्य आपल्या जबाबदारी, आपण प्रामाणिकपणे पार पाडली तर, तर कुठलाच वाद होणे शक्य नाही, संविधान हे आपल्या भारताला लाभलेली अनमोल देणगी आहे, त्याचे पूजन केल्यापेक्षा, संविधानामधील नियमांचे पालन करावे, भविष्यामध्ये तुम्ही चांगले नागरिक बनावे अशी अपेक्षा व्यक्त केली, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्या. त्याचे विचार आपल्या जीवनात अंगीकारा ,भारताची आन ,बाण ,आणि शान भारताचे संविधान .कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर पाटील सदार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात
आणि भारतीय संविधान यात कसे साम्य आहे हे विद्यार्थ्यांना समजून सांगितले. बाबासाहेबांनी आपल्या देशातील आपल्या मातीतील, बौद्ध धम्म स्वीकारला व आपल्या करोडो अनुयायांना शांतीचा मार्ग अर्पण केला. युद्ध नको बुद्ध हवा . असे विद्यार्थ्यांना समजून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.भक्ती जाधव वर्ग ९ वा हिने केले तर आभार प्रदर्शन श्री प्रमोद बकाल सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले अशा प्रकारे आमच्या विद्यालयामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला आदरांजली वाहण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular