Dainik Loktantra https://dainikloktantra.in Dainik Loktantra News Portal Thu, 09 Jul 2026 06:07:38 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.0.2 वाशिम येथील ज्येष्ठ पत्रकारांकडून खडसे कुटुंबाचे सांत्वन. https://dainikloktantra.in/uncategorized/%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%ae-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a0-%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0/ Thu, 09 Jul 2026 06:07:34 +0000 https://dainikloktantra.in/?p=2037 स्व. गुलाबराव खडसे यांच्या स्मृतींना दिला उजाळा.

दैनिक लोकतंत्र
वाशिम : येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेत कार्यरत असलेले विज्ञान शिक्षक स्व. गुलाबराव खडसे यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले. परिणामी खडसे कुटुंबावर हा खुप मोठा आघात झाला आहे. घरातील एक जबाबदार व कर्ताव्यक्ती गेल्याने हतबल झालेल्या कुटुंबास धीर देण्यासाठी आज दि.८ जुलै रोजी वाशिम येथील जेष्ठ पत्रकार सुनीलजी मिसर, प्रांजलभाऊ जैन, एआयआरचे जिल्हाप्रतीनिधी सुनीलजी कांबळे, सिटीन्यूज सुपरफास्टचेआवृत्ती संपादक आतिशभाऊ देशमुख, दैनिक जनमाध्यमचे जिल्हप्रतीनिधी पप्पूभाऊ घुगे आदी विविध माध्यमांच्या मान्यवर पत्रकारांनी स्व. खडसे सर यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
स्व. गुलाबराव खडसे हे केवळ एक आदर्श शिक्षक म्हणूनच नव्हे; तर सामाजिक कार्यात हिरारीने भाग घेणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून सर्वांना सुपरिचित होते. त्यामुळे विविध क्षेत्रात त्यांचा खुप मोठा मित्रपरिवार आहे. यावेळी मान्यवर पत्रकार बंधूंनी स्व. गुलाब खडसे यांची शिक्षक म्हणून असलेली कर्तव्यनिष्ठा, विद्यार्थीप्रिय स्वभाव आणि सामाजिक बांधिलकीच्या कामांना उजाळा देत स्व. खडसे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.
दरम्यान, उपस्थित जेष्ठ पत्रकारांनी शोकाकूल वसंत खडसे व समस्त कुटुंबीयांचे सांत्वन केले. ” या दुःखात पत्रकार बंधू तुमच्यासोबत आहेत, ” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रसंगी स्व. गुलाबराव खडसे यांचे थोरले बंधू वसंत खडसे यांनी सर्व मान्यवर पत्रकार बंधूंचे आभार मानले.

]]>
रिसोड तालुका व्हॉईस मीडियाकडून खडसे कुटुंबाचे सांत्वन. https://dainikloktantra.in/uncategorized/%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%a1-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%81%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%89%e0%a4%88%e0%a4%b8-%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%a1%e0%a4%bf/ Mon, 06 Jul 2026 17:43:48 +0000 https://dainikloktantra.in/?p=2034 स्व. गुलाबराव खडसे सर यांना वाहीली आदरांजली.

दैनिक लोकतंत्र
वाशिम : व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विंगचे जिल्हाध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार वसंत खडसे यांचे धाकटे बंधू स्व. गुलाबराव खडसे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. या दुःखद प्रसंगामुळे पत्रकार वसंत खडसे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना धीर देण्यासाठी आज दि.७ रोजी व्हॉईस ऑफ मीडियाचे मा. तालुकाध्यक्ष तथा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाउपाध्यक्ष विनोद पाटील बोडखे यांनी शेलुखडसे येथेल खडसे यांच्या निवासस्थानी भेट देत शोकाकुल कुटुंबाचे सांत्वन केले यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक भिकाजी पाटील नागरे, लोणी बु. येथील मा. सरपंच ज्ञानेश्वर पाटील बोडखे आदींची उपस्थिती होती.
दरम्यान, बोलतांना व्हॉईस ऑफ मीडियाचे बोडखे म्हणाले की, स्व. गुलाबराव खडसे सर हे विद्यार्थीप्रिय शिक्षक तर होतेच पण माझे जिवलग मित्र होते. एक आदर्श शिक्षक म्हणून ते सर्वांना सुपरिचित होते. त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांचे जीवन घडवले. एक संवेदनशील व्यक्तित्व व उत्तम माणूस आमच्यातून निघून गेला आहे. या दुःखात व्हॉईस ऑफ मिडियाचे सर्व पदाधिकारी वसंत खडसे यांच्या परिवारासोबत आहेत. असे बोलून पत्रकार विनोद बोडखे पाटील यांनी स्व. खडसे सर यांना ईश्वर चरणी सद्गतीमिळो अशी प्रार्थना केली व त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी खडसे परिवारातील सर्व सदस्य व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती सचिन दत्तराव खडसे, विठ्ठल पंजाबराव खडसे, वैभव गजानन खडसे आदींची उपस्थिती होती.

]]>
वाशिम जिल्हा मुख्याध्यापक संघाने घेतली खडसे कुटुंबाची भेट. https://dainikloktantra.in/uncategorized/%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%ae-%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%aa/ Sun, 05 Jul 2026 13:00:01 +0000 https://dainikloktantra.in/?p=2031 स्व. गुलाबराव खडसे सर यांच्या कुटुंबाचे केले सांत्वन.

दैनिक लोकतंत्र
वाशिम : जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात येत असलेल्या मोप येथील श्री शिवाजी विद्यालयात विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत असलेले स्व. गुलाबरा रामराव खडसे यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले. त्यांच्या दुःखद निधनामुळे संपूर्ण खडसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशा बिकट प्रसंगात धीर देण्यासाठी वाशिम जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शेलुखडसे येथे जाऊन खडसे कुटुंबाची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.
मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. विनोदराव नरवाडे, मुख्याध्यापक संघटनेचे रिसोड तालुकाध्यक्ष साहेबराव जाधव, नंधाना येथील मुख्याध्यापक दिनकरराव सरकटे, सवडचे मुख्याध्यापक सावसुंदर सर, खडकी सदार येथिल मुख्याध्यापक माधवराव जाधव, लिपिक माधव खडसे आणि सामाजिक कार्यकर्ते गजानन श्रीराम खडसे आदींनी खडसे कुटुंबाचे सांत्वन करत त्यांना या संकटातून सावरण्यासाठी धीर दिला आहे. याप्रसंगी स्व. खडसे सर यांचे थोरले बंधू वसंत खडसे व मुलगा रितेश गुलाबराव खडसे यांच्याशी चर्चा करत तुमच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत असा विश्वास दिला. यावेळी बोलतांना स्व. खडसे सर यांचे बंधू जेष्ठ पत्रकार वसंत खडसे यांनी मुख्याध्यापक संघाचे आभार मानले व सर्व शिक्षक बंधूंची ही साथ आमच्यासाठी खुप मोठा आधार असल्याचे सांगितले.

]]>
श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष लाव्हरे सर यांच्याकडून खडसे कुटुंबाचे सांत्वन. https://dainikloktantra.in/uncategorized/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5/ Sun, 05 Jul 2026 08:36:11 +0000 https://dainikloktantra.in/?p=2028 स्व. गुलाबराव खडसे सर यांच्या आठवणींना उजाळा.

दैनिक लोकतंत्र
वाशिम : येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था संचालित मोप येथील श्री शिवाजी विद्यालयात विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत असलेले स्व. गुलाबराव रामराव खडसे यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या दुःखद निधनाने शिक्षकवर्गात व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबाचा आधारवड हरवलेल्या खडसे कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आज दि.५ जुलै रोजी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे मान्यवर पदाधिकारी खडसे यांच्या निवासस्थानी पोहचले.
यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आदरणीय मा. प्राचार्य श्री. लाव्हरे सर आणि सेवानिवृत्त विज्ञान शिक्षक आदरणीय श्री. काठोळे सर यांनी उपस्थित राहून स्व. खडसे सर यांचे थोरले बंधू जेष्ठ पत्रकार वसंत खडसे व समस्त खडसे परिवाराची भेट घेतली.
“गुलाबराव खडसे सर हे केवळ शिक्षक नव्हते, तर विद्यार्थ्यांचे लाडके आणि शिक्षण क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तित्व होते. त्यांच्या जाण्याने संस्थेची मोठी हानी झाली आहे. या दुःखात संस्थेचे अध्यक्ष तथा अमरावती विभागाचे शिक्षक आमदार ॲड. किरणराव सरनाईक आणि आम्ही सर्व खडसे कुटुंबियांच्या पाठीशी आहोत,” असे संस्थेचे उपाध्यक्ष मा.प्राचार्य लाव्हरे सर म्हणाले.
सेवानिवृत्त शिक्षक काठोळे सरांनी स्व. खडसे सर यांच्या शिक्षक म्हणून असलेल्या कर्तव्यनिष्ठेची, विद्यार्थीप्रिय स्वभावाची आणि मित्रभावाने वागण्याच्या गुणांची आठवण काढत स्व. गुलाबराव खडसे सर यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी स्व. खडसे सर यांच्या पत्नी श्रीमती रेखाताई खडसे, वहिनी सौ. अनिताताई वसंत खडसे, मुलगा रितेश गुलाबराव खडसे, चि.अनुज गुलाबराव खडसे,पुतणे मनीष वसंतराव खडसे, रमेश वसंतराव खडसे व मोठे बंधू पंजाबराव नागोराव खडसे आदींची उपस्थिती होती. दुःखाने हतबल झालेल्या कुटुंबास संस्थेकडून धीर दिल्याबद्दल
खडसे परिवाराने मान्यवरांचे आभार मानले. या भावनिक प्रसंगी सर्वच उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

]]>
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी अमित पाटील खडसे. https://dainikloktantra.in/uncategorized/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%81%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b8-%e0%a4%b6%e0%a4%b0%e0%a4%a6/ Sat, 04 Jul 2026 13:23:58 +0000 https://dainikloktantra.in/?p=2025 वाशिम जिल्ह्यात कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष, पक्षाला नवी धार मिळणार

दैनिक लोकतंत्र
वाशिम : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने वाशिम जिल्हाध्यक्षपदी रिसोड तालुक्यातील सर्वांना सोबत घेऊन चालणारे युवा नेतृत्व अमित पाटील खडसे यांची नियुक्ती केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सदर नियुक्ती केली आहे. सर्वसमावेशक असं युवा नेतृत्व जिल्हयाला लाभल्याने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून रिसोड, मालेगांव येथे जल्लोष साजरा करण्यात आला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता या महत्त्वाच्या नियुक्तीमुळे पक्षाला नवी धार मिळणार असल्याचे राजकीय तज्ञ बोलत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हाध्यक्ष बाबाराव पाटील खडसे यांचे सुपुत्र असल्याने नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अमित पाटील खडसे यांना आपसूकच राजकीय वारसा आहे. त्यांच्या नेतृत्वात अमित पाटील प्रचंड मतांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. तद्वतच बालाजी सहकारी सूतगिरणीच्या माध्यमातून अमित पाटील यांना सहकार क्षेत्राचा दांडगा अनुभव आहे. शिवाय जिवन विकास शिक्षण संस्थेचे ते सचिव असून शैक्षणिक क्षेत्रात ते मोलाची कामगिरी बजावत आहेत. स्वतः उच्चविद्याविभूषित असलेले अमित पाटील खडसे हे शाहू, फुले,आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचे पाईक आहेत. त्यामुळे साहजिकच अठरा पगड जातीधर्मांच्या लोकांसोबत त्यांची नाळ जुळलेली आहे. त्यामुळे शरदचंद्र पवार यांच्या पुरोगामी विचारधारेवर चालणारा, पक्षाची ध्येयोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवणारा आणि शेतकऱ्यांचा आवाज असलेला चेहरा जिल्हाध्यक्षपदी आल्याने पक्षाला नवी धार मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.

शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारांना घेऊन वाशिम जिल्ह्यात पक्षाला नवसंजीवनी देणे हे माझे पहिले कर्तव्य राहील. शेतकरी,कष्टकरी, युवक आणि महिला व गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी वेळप्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरू अशी ग्वाही नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अमित पाटील खडसे यांनी दैनिक लोकतंत्रशी बोलतांना दिली.

]]>
ज्यांनी पैसे दिले, त्यांचे अनुदान जमा केले. https://dainikloktantra.in/uncategorized/%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%88%e0%a4%b8%e0%a5%87-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a/ Fri, 24 Apr 2026 07:14:02 +0000 https://dainikloktantra.in/?p=2017 घरकुल योजनेत हेराफेरी, मालामाल झाले अधिकारी !

वसंत खडसे
दैनिक लोकतंत्र
वाशिम :

जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध घरकुलसबंधित योजना भ्रष्टाचाराचे कुरण बनल्या आहेत. प्रधानमंत्री आवास, रमाई आवास, शबरी आवास आदी योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करतांना मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असल्याचे वास्तव समोर येत आहे. ज्या लाभार्थ्यांनी पैसे दिले त्यांचेच अनुदान हप्ते जमा करण्यात आले अशी विश्वसनीय माहिती हाती आली आहे. परिणामी या योजनेत स्थानिक पातळीवरील काही सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक व नेहमीचेच सराईत दलाल मालामाल झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील रिसोड आणि मालेगांव तालुक्यात घरकुलांच्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाली असून पात्र लाभार्थ्यांना डावलून बोगस लाभार्थ्यांच्या नावाखाली शासकीय निधी हडपण्यात आला असल्याची माहिती सिटीन्यूज सुपरफास्टकडे आली आहे. यात रिसोड तालुका अव्वल स्थानावर असल्याचे बोलले जात आहे. ही बाब तालुक्यातील अनेक मातब्बर नेत्यांसाठी लज्जास्पद आहे. तर कर्तव्यदक्ष म्हणून नावलौकिक असलेल्या गटविकास अधिकाऱ्यांच्या लौकिकास कलंकित करणारी आहे. पात्र यादीत नाव समाविष्ट करण्यापासून ते थेट हप्ते बँक खात्यात जमा करण्यापर्यंत गोरगरिबांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. परिणामी ज्या गरीब लाभार्थ्यांना लाच देणे शक्य नाही अशा लाभार्थ्यांना डावलून अपात्र, बोगस लाभार्थ्यांच्या नावाखाली घरकुल अनुदानाची खैरात करण्यात येत आहे. याचे अनेक पुरावे समोर येत आहेत. यात ज्यांच्याकडे दहा एकरापासून पन्नास एकरापर्यंत जमीन जुमला आहे. ज्यांची टोलेजंग घर बांधलेली आहेत अशा लोकांना सुद्धा घरकुल पात्र यादीत समाविष्ट करून अनुदान देण्यात आले आहे. तर काही ठिकाणी चक्क मयत असलेल्या व्यक्तींच्या नावावर देखील घरकुल अनुदान देण्यात आले असल्याची खळबळजनक माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष बाब म्हणजे जे गावात राहत नाहीत अशा लोकांच्या नावावर घरकुल मंजूर करून पहिला व दुसरा हप्ता देण्यात आला असून प्रत्यक्षात मात्र एक वीटही रचलेली नाही. ही बाब संनियंत्रण करणाऱ्या यंत्रणेच्या पारदर्शकतेवर प्रश्चिन्ह निर्माण करणारी आहे. या घोटाळ्यात आणि लाचखोरीत काही अधिकाऱ्यांचे विश्वासू दलाल महत्त्वाची भूमिका बजावत असून स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधीपासून ते गृह निर्माण अभियंता, विस्तार अधिकारी व त्यांचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या प्रमाणात माया गोळा करत आहेत. यामुळे शासनाच्या स्तुत्य हेतुला सुरुंग लावून गोरगरिबांच्या हक्कावर गदा आणली जात आहे. या गंभीर प्रकाराची तज्ञ पथकांकडून सखोल व पारदर्शक चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई व्हावी तरच शासनाचा मुख्य हेतू सफल होईल असे सुजाण नागरिक बोलत आहेत. या बाबत अनेक तक्रारी देखील प्रशासनाकडे आल्या आहेत. परंतु ” आम्ही सर्व मावसभाऊ, मिळून मिसळून खाऊ..! ” हे तत्व जोपासत वरिष्ठांकडून अशा तक्रारींना केराची टोपली दाखवण्यात येत आहे. त्यामुळे ” हम करें सो कायदा ” या तोऱ्यात काही अधिकारी, पदाधिकारी आणि क्षेत्रीय कर्मचारी वावरत आहेत. ही बाब वरिष्ठ प्रशासनासाठी अशोभनीय आहे.

बॉक्स.

अकुशल काम, रोजगार सेवकच हडपतो दाम..!
प्रधानमंत्री आवास योजनेत व ईतर काही घरकुल योजनेत अकुशल कामासाठी मजूर लावून काम करण्याची अट आहे. यासाठी जॉबकार्ड असलेल्या मजुरांना काम मिळावे हा स्तुत्य हेतू समोर ठेवण्यात आला आहे. त्यासाठी ठराविक अतिरिक्त निधी देण्यात येतो. मात्र इथेही मोठी हेराफेरी होत आहे. रिसोड तालुक्यात काही गावातील रोजगार सेवकांनी आपल्या मर्जीतील जॉबकार्ड धारक मजुरांचे मस्टर तयार करून शासकीय निधी स्वतःच हडप केला असल्याची तक्रार दाखल झाली आहे. मात्र या तक्रारींकडे संबंधित प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गरकुलसबंधी ज्या काही योजना केंद्र व राज्य सरकारने सुरू केल्या आहेत. त्या सर्व योजना केवळ भ्रष्टाचाराच्या कुरण बनल्या आहेत. हेच रिसोड तालुक्यातील महाघोटाळ्यावरून पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे.

]]>
अष्टपैलू कर्तृत्व आणि सदाबहार व्यक्तित्वाचा रुपेरी प्रवास. https://dainikloktantra.in/uncategorized/%e0%a4%85%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%aa%e0%a5%88%e0%a4%b2%e0%a5%82-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%a6/ Sat, 17 Jan 2026 16:57:00 +0000 https://dainikloktantra.in/?p=2012 समाजासाठी झटणारे पत्रकार बाजड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

वसंत खडसे
दैनिक लोकतंत्र
वाशिम :
जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात येत असलेल्या नावली या छोट्याशा खेडे गावातून आलेला माझा लाडका भाचा रुपेश बाजड हा जन्मतःच अष्टपैलू गुणांची देणगी सोबत घेऊन आला. त्याचे ते उत्साही, आनंदी आणि चेहऱ्यावरील हास्य कधीही कमी होत नाही. त्याचे विचार आणि कृती नेहमी समाजाच्या कल्याणासाठीच तत्पर असतात. कदाचित यामुळेच तो केवळ पत्रकारितेतच नव्हे; तर एक औषध विक्रेतापासून विविध संघटना, आणि आपले सरकार सेवा सेतूच्या माध्यमातून तो आज संपूर्ण तालुक्यात एक सच्चा समाजसेवी म्हणून ओळखला जातो. विविध क्षेत्रात काम करत असताना त्याचे ते अष्टपैलू व्यक्तिमत्व प्रत्येक क्षेत्रातील गरजवंताची गरज पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. याच सेवाभावी गुणांमुळे त्याच्या सानिध्यात आलेल्या असंख्य युवकांचे जीवन उजळलं आहे. आणि आजही तो इतरांसाठी एक प्रेरणास्रोत ठरत आहे. असे सदाबहार व्यक्तित्व असलेला आणि आमच्या व्हाईस ऑफ मीडिया या जागतिक पत्रकार संघटनेचा तालुका अध्यक्ष पत्रकार रुपेश संजय बाजड यांच्या आज १८ जानेवारी वाढदिवसानिमित्त एका रुपेरी प्रवासाचा घेतलेला हा अल्पसा आढावा. समाजासाठी न थांबता झटणाऱ्या रुपेशला दैनिक लोकतंत्र परिवाराकडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
काही व्यक्ती पदामुळे मोठ्या होत नाहीत, तर त्यांच्या वागण्यातून समाज मोठा होतो. रुपेश पाटील बाजड हे असेच एक व्यक्तिमत्त्व आहे—जे नाव ऐकताच विश्वास, आपुलकी आणि सेवाभाव या शब्दांचा अर्थ स्पष्ट होतो. रिसोड तालुक्यातील नावली गावात जन्मलेला हा तरुण आज संपूर्ण तालुक्यासाठी केवळ ओळखीचा चेहरा नसून आधाराचा स्तंभ ठरला आहे.
वारकरी परंपरेतून मिळालेली साधेपणा, समतेची भावना आणि माणुसकीची शिकवण त्यांनी आयुष्यभर जपली. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर “सेवा हाच धर्म” हा विचार ठामपणे दिसतो. संघर्ष, अडचणी आणि जबाबदाऱ्या यांचा सामना करत त्यांनी स्वतःचे अस्तित्व उभे केले; मात्र त्या प्रवासात कधीही माणुसकी हरवू दिली नाही.
आज रिसोड शहरात ते स्वतःचे मेडिकल आणि आदर्श आपले सरकार सेवा केंद्र चालवत असले तरी त्यांची खरी ओळख ही मदतीसाठी सदैव उघड्या दाराची आहे. शासकीय कागदपत्रे, योजना, सेतू सेवा असोत किंवा एखाद्या सामान्य माणसाचा प्रश्न—“हे होईल का?” या शंकेपेक्षा “हे नक्की करून देऊ” हा विश्वास ते लोकांच्या मनात निर्माण करतात. त्यामुळेच शासन आणि नागरिक यांच्यातील अंतर कमी करण्याचे काम ते शांतपणे पण परिणामकारकरीत्या करत आहेत.
सामाजिक जाणीव त्यांच्या कृतीतून ठळकपणे दिसते. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून अन्यायाविरोधात उभे राहणे, शिवसूर्य प्रतिष्ठानद्वारे महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचवणे, रक्तदान शिबिरे आयोजित करणे किंवा गरजूंना कोणताही गाजावाजा न करता मदत करणे—या साऱ्या गोष्टी त्यांच्या संवेदनशील मनाची साक्ष देतात. पत्रकारितेतही त्यांनी केवळ बातमी न लिहिता, समाजाचा आवाज बनण्याचा प्रयत्न केला.
कार्याची दखल घेत त्यांना मिळालेले पुरस्कार हे त्यांच्या प्रवासाचे मानांकन आहेत; मात्र लोकांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान आणि “हा आपलाच माणूस आहे” ही भावना हा त्यांचा खरा सन्मान आहे.
आज रुपेश पाटील बाजड हे नाव केवळ व्यक्तीचे नाही, तर मूल्यांचे प्रतीक बनले आहे. समाजासाठी जगण्याचा अर्थ शब्दांत नाही, तर कृतीत कसा उतरवता येतो—याचे जिवंत उदाहरण म्हणजेच रुपेश पाटील बाजड.


काही व्यक्ती पदामुळे मोठ्या होत नाहीत, तर त्यांच्या वागण्यातून समाज मोठा होतो. रुपेश पाटील बाजड हे असेच एक व्यक्तिमत्त्व आहे—जे नाव ऐकताच विश्वास, आपुलकी आणि सेवाभाव या शब्दांचा अर्थ स्पष्ट होतो. रिसोड तालुक्यातील नावली गावात जन्मलेला हा तरुण आज संपूर्ण तालुक्यासाठी केवळ ओळखीचा चेहरा नसून आधाराचा स्तंभ ठरला आहे.
वारकरी परंपरेतून मिळालेली साधेपणा, समतेची भावना आणि माणुसकीची शिकवण त्यांनी आयुष्यभर जपली. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर “सेवा हाच धर्म” हा विचार ठामपणे दिसतो. संघर्ष, अडचणी आणि जबाबदाऱ्या यांचा सामना करत त्यांनी स्वतःचे अस्तित्व उभे केले; मात्र त्या प्रवासात कधीही माणुसकी हरवू दिली नाही.
आज रिसोड शहरात ते स्वतःचे मेडिकल आणि आदर्श आपले सरकार सेवा केंद्र चालवत असले तरी त्यांची खरी ओळख ही मदतीसाठी सदैव उघड्या दाराची आहे. शासकीय कागदपत्रे, योजना, सेतू सेवा असोत किंवा एखाद्या सामान्य माणसाचा प्रश्न—“हे होईल का?” या शंकेपेक्षा “हे नक्की करून देऊ” हा विश्वास ते लोकांच्या मनात निर्माण करतात. त्यामुळेच शासन आणि नागरिक यांच्यातील अंतर कमी करण्याचे काम ते शांतपणे पण परिणामकारकरीत्या करत आहेत.
सामाजिक जाणीव त्यांच्या कृतीतून ठळकपणे दिसते. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून अन्यायाविरोधात उभे राहणे, शिवसूर्य प्रतिष्ठानद्वारे महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचवणे, रक्तदान शिबिरे आयोजित करणे किंवा गरजूंना कोणताही गाजावाजा न करता मदत करणे—या साऱ्या गोष्टी त्यांच्या संवेदनशील मनाची साक्ष देतात. पत्रकारितेतही त्यांनी केवळ बातमी न लिहिता, समाजाचा आवाज बनण्याचा प्रयत्न केला.
कार्याची दखल घेत त्यांना मिळालेले पुरस्कार हे त्यांच्या प्रवासाचे मानांकन आहेत; मात्र लोकांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान आणि “हा आपलाच माणूस आहे” ही भावना हा त्यांचा खरा सन्मान आहे.
आज रुपेश पाटील बाजड हे नाव केवळ व्यक्तीचे नाही, तर मूल्यांचे प्रतीक बनले आहे. समाजासाठी जगण्याचा अर्थ शब्दांत नाही, तर कृतीत कसा उतरवता येतो—याचे जिवंत उदाहरण म्हणजेच रुपेश पाटील बाजड.

]]>
ज्येष्ठ पत्रकार गजानन बानोरे यांना दर्पण जीवन गौरव पुरस्कार जाहीर. https://dainikloktantra.in/uncategorized/%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a0-%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%97%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%a8-%e0%a4%ac%e0%a4%be/ Sun, 04 Jan 2026 08:41:40 +0000 https://dainikloktantra.in/?p=2001 साई नगरीत ६ जानेवारीला होणार वितरण सोहळा.

वसंत खडसे
दैनिक लोकतंत्र
वाशिम :
मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आणि आधुनिक पत्रकारितेचे पितामह, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा दर्पण जीवन गौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार गजानन बानोरे यांचे नाव जाहीर झाले आहे. सदर पुरस्काराची घोषणा पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांनी केली असून ६ जानेवारी रोजी साई नगरी शिर्डी येथे दिमाखदार सोहळ्यात पत्रकार बानोरे यांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. पत्रकारदिनाच्या औचित्यावर हा पुरस्कार सोहळा पार पडत असल्याने या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील प्रतिभावान मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यभरातील पत्रकार, लेखक आणि माहिती अधिकाऱ्यांची उपस्थिती लाभणार असल्याने हा वितरण सोहळा माध्यम क्षेत्रातील मानाचा उत्सव ठरणार आहे.
रिसोड येथील ज्येष्ठ पत्रकार गजानन बानोरे हे विधायक पत्रकारितेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून संपूर्ण जिल्ह्यात सुपरिचित आहेत. पत्रकाराला आवश्यक असणारी चौकस वृत्ती, नाविन्याचा सतत शोध आणि घटनेचा अचूक वेध घेत वृत्तांकन करणे ही त्यांच्या पत्रकारितेची विशेषतः आहे. जवळपास तीन दशकांपासून प्रामाणिकता, पारदर्शकता आणि सत्यासाठी निडरपणे वृत्तांकन करत त्यांनी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची गरिमा कायम जोपासली आहे. अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी आपल्या लेखणीला तलवारीची ताकद देत, पत्रकार गजानन श्रीराम बानोरे यांनी समाजाला दिशा देण्याचे कार्य अव्याहतपणे केले आहे आणि आजही करत आहेत. एका आघाडीच्या दैनिकात काम करत असताना आपल्या शहरातील स्थानिक समस्यांना अधिकाधिक वाचा फोडण्यासाठी त्यांनी स्वतःचे पिंगळाक्षी एक्सप्रेस वृत्तपत्र सुरू केले आहे. पत्रकारितेचे व्रत सांभाळतांना त्यांनी स्थितप्रज्ञ,ध्येयवादी, समन्वयवादी आणि एक अजातशत्रू पत्रकार म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शैक्षणिक कार्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक कार्य अखंडपणे सुरू ठेवले आहे. त्यांच्या या महान कार्याची योग्य दखल घेत त्यांना दर्पण जीवन गौरव पुरस्कार देण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. मराठी वृत्तपत्राचे जनक अद्यपत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा स्मृतिदिन म्हणून ६ जानेवारी हा “पत्रकार दिन” दरवर्षी साजरा करण्यात येतो. आणि या दिवसाचे आणखी विशेष महत्त्व म्हणजे बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ” दर्पण ” ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते. अशा अतिविशेष दिवसाच्या शुभपर्वावर रिसोड येथील पत्रकार गजानन श्रीराम बानोरे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. ही केवळ रिसोड तालुक्यासाठीच नव्हे; तर संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. त्यामुळे विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संत नगरी शिर्डी येथे पार पडणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार संघातर्फे करण्यात आले आहे.

]]>
निवडणुकीच्या तोंडावर, संभाजी ब्रिगेडचा खांदेपालट. https://dainikloktantra.in/uncategorized/%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%82/ Sun, 07 Dec 2025 17:14:24 +0000 https://dainikloktantra.in/?p=1998 जिल्हाध्यक्षपदाची धुरा गजानन खंदारे यांच्या खांद्यावर, तर जिल्हा सचिवपदी रमेश मुंजे.

वसंत खडसे
दैनिक लोकतंत्र
वाशिम :
नगर परिषद व नगर पंचायतींच्या निवडणुकांचा धुरळा बसत असतानाच, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले असून, कोणत्याही क्षणी पुन्हा नव्याने आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशा पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडने आपल्या कार्यकारिणीमध्ये मोठे फेरबदल करून खांदेपालट केले आहेत. जिल्हा प्रवक्ता म्हणून जबाबदारी सांभाळणारे गजानन खंदारे यांच्या खांद्यावर जिल्हाध्यक्षपदाची धुरा टाकण्यात आली असून, जिल्हा सचिव पदाची जबाबदारी रमेश मुंजे मंगरूळपीर यांच्यावर सोपविण्यात आली असल्याची माहिती संभाजी ब्रिगेड पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे.
संभाजी ब्रिगेड ही गेली अनेक वर्षे एक विचारधारा म्हणून समाजाच्या प्रत्येक स्तरात रुजलेली आहे. संभाजी ब्रिगेडचा विचार आज अशा एका गावात किंवा घरातही पोहोचलेला नाही असे ठामपणे म्हणता येत नाही. सर्वसामान्यांच्या सन्मानासाठी लढणारी, शेतकरी-मजुरांच्या प्रश्नांवर नेहमीच आवाज उठवणारी अशी ही चळवळ आता राजकीयदृष्ट्या अधिक सक्षम होण्याच्या दिशेने ठोस पावले टाकत आहे.
सत्तेची चावी हातात असली तरच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणे अधिक प्रभावीपणे शक्य होते, या धोरणात्मक विचारातून संभाजी ब्रिगेडने वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार नवीन रणनीती आखली आहे. या रणनीतीत महत्त्वाचा निर्णय घेत जिल्हा प्रवक्ता गजानन खंदारे यांच्याकडे संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोजदादा आखरे यांनी नियुक्तीपत्र देऊन ही जबाबदारी खंदारे यांना सोपवली.
या निर्णयाबाबत विभागीय अध्यक्ष गजानन भोयर म्हणाले की, “वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी गजानन खंदारे नक्कीच सक्षमतेने पार पाडतील, यात शंका नाही.
नगरपरिषद निवडणुकांचा धुरळा बसत असतानाच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वेध सर्वच पक्षांना लागले आहेत. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.
अशा पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडने आपल्या कार्यकारिणीमध्ये मोठे फेरबदल करून आगामी निवडणुकीसाठी सज्जता दर्शवली आहे.

युतीसाठी चर्चेला सुरुवात,
इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू

संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकदीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लढवणार आहे. विविध राजकीय पक्षांशी युतीबाबत बोलणी सुरू असून इच्छुक उमेदवारांची चाचणी देखील गतीने केली जात आहे. संघटनाची बांधणी, पक्षाची भूमिका आणि निवडणूक व्यवस्थापन पाहता खंदारे यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला मोठ्या प्रमाणात होणार असल्याने त्यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर
जिल्हा सचिव पदाची जबाबदारी रमेश मुंजे मंगरूळपीर यांना देण्यात आली आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी अध्यक्षस्थानी विभागीय अध्यक्ष गजानन भोयर होते.
जिल्हाध्यक्ष गणेश सुर्वे, विभागीय प्रवक्ता ॲड. हिरामण मोरे, विभागीय उपाध्यक्ष नितेश पोहकर, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकृष्ण शिंदे, राधेशाम शिरसाठ, संतोष भिसडे, राहुल सोमटकर, विष्णु भोयर, मालेगाव तालुका अध्यक्ष विनोद जाधव, विजय जुनजारे, समाधान शिंदे, नितीन जाधव यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

]]>
स्व. किसनराव सदार विद्यालयात डॉ. बाबासाहेबांना अभिवादन. https://dainikloktantra.in/uncategorized/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%b8%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2-3/ Sun, 07 Dec 2025 16:54:01 +0000 https://dainikloktantra.in/?p=1995 ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन.

दैनिक लोकतंत्र
वाशिम :
जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात येत असलेल्या खडकी सदार येथील स्व. किसनराव सदार विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा उद्योजक डॉ. ज्ञानेश्वर पाटील सदार होते.
रिसोड तालुक्यातील खडकी (सदार) येथील स्व. किसनराव सदार विद्यालयामध्ये ६ डिसेंबर रोजी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ.ज्ञानेश्वर पाटील सदार होते.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री माधवराव जाधव मुख्याध्यापक, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री गजानन सदार मा .जि प शाळा खडकी सदार शाळा समिती अध्यक्ष, श्री दिलीप चोकटे ज्येष्ठ नागरिक हे होत. उपस्थितीमध्ये शाळेचे शिक्षक श्री प्रमोद बकाल, श्री सतीश वायाळ, श्री प्रदीप वाठोरे, श्रीराम फुपाटे, श्री माधव मार्कड, श्री मंगेश कोरडे , श्री शिवाजी काका सुरूशे यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आमंत्रित
सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणामध्ये शाळेचे शिक्षक श्री प्रदीप वाठोरे यांनी विद्यार्थ्यांना महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये वर्ग दहावीची कु. वैष्णवी सदार हिने आपल्या भाषणातून ज्वलंत मुद्दे आणि भारतीय संविधान याविषयी अतिशय सुंदर मनोगत व्यक्त करत सर्वांचे लक्ष वेधले.कार्यक्रमांचे प्रमुख मार्गदर्शक श्री माधवराव जाधव मुख्याध्यापक,यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये संविधानाची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली. आपला देश धर्मनिरपेक्ष आहे, त्यामुळे कोणत्याही धर्माचे व्यक्ती आपल्या देशामध्ये मोठ्या गर्वाने राहू शकतात. आपल्या देशाला एकजुटीने राहण्यासाठी, विकास करण्यासाठी, विज्ञानवादी बनण्यासाठी, संविधानाची खूप मोठी साथ आपल्याला लाभलेली आहे. प्रांतवाद, भाषावाद, यांना आपल्या देशामध्ये कुठलाच थारा नाही. आपला भारत देश अखंड आहे तो फक्त आणि फक्त संविधानामुळे.हे संविधान कसे अबाधित राहील याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. हीच महामानवाला खरी आदरांजली होईल असे विद्यार्थ्यांना समजून सांगितले. कार्यक्रमाचे पाहुणे श्री गजानन सदार यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेबांचा संघर्ष आणि संविधान निर्मितीमध्ये आलेल्या अडचणी या सर्वांची विद्यार्थ्यांना खोलवर माहिती दिली . आपली कर्तव्य आपल्या जबाबदारी, आपण प्रामाणिकपणे पार पाडली तर, तर कुठलाच वाद होणे शक्य नाही, संविधान हे आपल्या भारताला लाभलेली अनमोल देणगी आहे, त्याचे पूजन केल्यापेक्षा, संविधानामधील नियमांचे पालन करावे, भविष्यामध्ये तुम्ही चांगले नागरिक बनावे अशी अपेक्षा व्यक्त केली, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्या. त्याचे विचार आपल्या जीवनात अंगीकारा ,भारताची आन ,बाण ,आणि शान भारताचे संविधान .कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर पाटील सदार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात
आणि भारतीय संविधान यात कसे साम्य आहे हे विद्यार्थ्यांना समजून सांगितले. बाबासाहेबांनी आपल्या देशातील आपल्या मातीतील, बौद्ध धम्म स्वीकारला व आपल्या करोडो अनुयायांना शांतीचा मार्ग अर्पण केला. युद्ध नको बुद्ध हवा . असे विद्यार्थ्यांना समजून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.भक्ती जाधव वर्ग ९ वा हिने केले तर आभार प्रदर्शन श्री प्रमोद बकाल सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले अशा प्रकारे आमच्या विद्यालयामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला आदरांजली वाहण्यात आली.

]]>